आत्ताचं प्रेम..
आयुष्यातले कितीतरी क्षण आपण प्रेमासाठी घालतो , पण त्यात पडलेल्या पैकी एखादाच प्रगतीही करतो... कलियुगातलं हे प्रेम क्षणात जुळतं, पण कंटाळा आला म्हणून दुरही पळतं... आताच्या काही प्रेमींची बाप्पा लक्षणंही विचित्र असतात, प्रेमात पडले म्हणजे घरच्यांनाही विसरत असतात... पहिली गोष्ट म्हणजे या प्रेमाचा काही नेम च नसतो , हृदयाशी खेळला जाणारा तो एक गेमच असतो ... मी म्हणतो प्रेम कसं समजून व्हायला हवं, आपली माणसं आणि प्रगती ही सोबत राहील एवढं मात्र पाहायला हवं... खुपच वेळ वाया जातो या प्रेमात कळतही नसतं, अन कळतही असलं तरी मन वळत नसतं, प्रेम असतं एक निस्वार्थी बंधन , हृदय नसतं त्यात वाईट हेतूंचं सदन , खरं प्रेम जेव्हा करायला लागतील सर्व, तिथंच निर्माण होऊ शकेल आणखी एक नंदनवन...! गणेश शेळके (१३-०६-२०१८)