Posts

Showing posts from April, 2020

दिल खोल के खुशी मना मेरे दोस्त,

Image
आयुष्य कुठपर्यंत साथ देईल हे सांगता येत नाही...  पण जितकं जगायचं न, सालं मोकळं हसून जगायचं..! घरातल्या, दारातल्या ,कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीकडे गंमतीने लक्ष द्यायचं !.. सिरीयस चेहरा ठेवून आपल्यावर प्रेम करणाऱ्या ला उदास कशाला बरं करायचं..? एन्जॉय करत राहायचं, प्रत्येक घटनेकडे पोजिटिव्हली बघायचं... पोरीने धोका दिला, घरचे त्रास देतात, दिवस बोर जातो, कोणी भाव देत नाही, हे सारे साले बहाणे आहेत जीवनातले आपल्याला एन्जॉय पासून परावृत्त करण्यासाठी ! पैसे कमवायचेत ,घर चालवायचंय, जबाबदारी जास्त आहे, घरचा मोठा आहे, लोकं नाव ठेवतात, ह्या असल्या छटाक कारणामुळे स्वतः ला गमावू नका,  प्रत्येक दिवस आनंदाने जगण्यासाठी ,कुणाला तरी हसवण्यासाठी, त्याला आपण आहोत असं स्पेशल वाटण्यासाठी काहीतरी करावं, असं काहीतरी आपल्या वागण्यात पाहिजे ! निसर्गाने दिलेल्या शरीर संपत्तीचा महत्वाचा भाग म्हणजे आपला चेहरा. मग तो कसाही असला तरी तो आपल्या स्वतः साठी जगातला सर्वात सुंदर चेहरा असला पाहिजे ! फेकून द्या साला तो न्यूनगंड ! की मी दिसायला असा, तसा ! ज्याचं मन नेहमी दुसऱ्याला आनंदात पाहून खुश होतं...

कोरोना लॉकडाऊन

Image
जन्म माणसाचा भेटला पण मानवाने नाही केली कदर, प्रदूषण तर करतच होता पण कोरोनाचाही आणला कहर... जहर खायला पैसे नव्हते वरून लॉकडावून आले, उधारीमध्ये दुकानदार किमती वाढवू लागले, सहकार्याची ची गरज आता करायला पाहिजे मदत, पण काही जणांची काही करून हिंडण्याची सुटत नाही आदत... माणसानेच केलं निर्माण हे जगावेगळं संकट, आता तरी सावध व्हारे परिस्थिती होण्याआधी बिकट... पूर्ण माहिती नसतानाही मेसेज  देतात पाठवून, अफवा पसरवून टाकतात सगळ्या देतात घाबरवून... काही करतात रिकाम्या गोष्टी, फालतू चर्चा घडवून, नावं ठेवतात  सरकारला, नियम सारे तुडवून... गोंधळ हा कोरोना चा जाणार नाही लवकर, कारण ऐकत नाहीत लोक काही  फिरत आहेत रस्त्यावर... लॉकडाऊन चं करून समर्थन घरीच थांबू आपण, सोशल मीडिया तर्फे घेऊन ज्ञान, करू माणुसकीचे सांत्वन..                   -   ग.का.शेळके

हक्क कोणता...

Image
हक्क कोणता सांगू मी, तुझ्यावर अन तुझ्या मनावर, अंतःकरण रिते झाले अन भाव झाला अनावर, जीव होतो कासावीस अन  मन होते गहिवर...    -ग.का.शेळके

मुलांना फक्त मोठं करून कर्तव्य संपत नाही..

मुलं जर सुधरण्याचा प्रयत्न करत असतील तर आई वडिलांचं कर्तव्य आहे की त्यांना समजून घ्यावं.त्यांच्या चुकांबद्दल कर्कशपणे ओरडून ओरडून त्याचं डोकं खराब करण्यापेक्षा त्याना  शांत चित्ताने प्रेमानं बोलून समजावून सांगितलं तर ते  तुमचं नक्कीच ऐकतील किंवा थोडं समजून तरी घ्यायचा प्रयत्न करतील..पण जर तुम्ही त्यांच्या एखाद्या चुकीवर वारंवार बडबड बडबड सुरूच ठेवत असाल,वारंवार त्यांना त्याच चुकीची आठवण करून देत असाल,तर ते सुधरणार तर नाहीच नाही ; पण त्यांचा सुरू असलेला प्रयत्नही ते बंद करून टाकतील...       तुम्ही त्यांच्यासाठी कितीही केलं,कितीही दिवस रात्र काम करून त्यांना हवं ते दिलं तरी मी वर बोलल्याप्रमाणे जर तुम्ही त्यांना समजून न घेता तसे वागले,तर माफ करा साहेब, त्यांना बिघडायला बिलकुल वेळ लागणार नाही.मुलगा जर खूप शिकूनही बेरोजगार राहत असेल तर त्याबद्दल त्याच्यावर ओरडत राहिल्यापेक्षा त्याला एकांतात नेऊन त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवून बस थोडं प्रेमानं त्याचा प्रॉब्लेम विचारल्यास त्याला कन्फरटेबल होईल आणि तो त्याचं मन तुमच्या जवळ मोकळं करेल.पण दुर्दैवाने असे पालक खूप कमी ...