माझं ठरलेलं आहे, जोपर्यंत स्वतः आर्थिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या जबाबदार बनत नाही. तोपर्यंत लग्नाच्या ध्यानी लागायचं नाही. हल्ली विचारांचे प्रवाह खूप च उलट्या दिशेने वाहतांना मी बघितले. सासू सुनांमध्ये छटाक छटाक गोष्टींवरून वाद होताना मी पाहिले. आजच्या आणि कालच्या पिढीतील विचारांचा हा विरोधाभास खूपच वाईट प्रभाव टाकत आहे असं मला प्रकर्षाने जाणवते आहे..जर समोरच्या येणाऱ्या पिढीला ही जुनी पिढी जुन्याच मापात धरून त्यांच्या मनासारखं वागण्यासाठी अपेक्षा ठेवत असेल तर खूप अवघड आहे!...आणि येणारी नवीन पिढी म्हणजे सून ,जोपर्यंत स्वतः च्या मतलबाच्या पलीकडे विचार करणार नाहीत तोपर्यंत अनेक घटस्फोट, अनेक दुरावे, अनेक कुसंवाद टाळता येणे जवळपास अशक्य होऊन जाईल... चुका कोण करत नाही? मी तर खूप चुकतो. पण चुकल्यावर माफी मागून प्रेमानं एकमेकांना समजून घेणाऱ्या सास सुना बघायला भेटणं म्हणजे आजकाल दुर्मिळ गोष्ट झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टी, ज्या हिने माझ्या मनासारख्या केल्या पाहिजेत, हिने समजून घेतलं पाहिजे, हिनेच लक्ष दिलं पाहिजे असे तोरे मिरवणाऱ्या बाया स्वतः च्याच हाताने मुलाचं आय...
Comments
Post a Comment