साऱ्याच मनांना हक्क आहे...

साऱ्याच मनांना जन्मसिद्ध 
हक्क आहे हसण्याचा.
आयुष्यातला आनंद 
मनापासून भोगण्याचा..
कितीही जन्म गेले 
तरी भाग्य लागते 
माणसाचा जन्म भेटण्याचा !
हक्क आहे ,हक्क आहे सर्वांना
आपला विषय मांडण्याचा,
प्रत्येक शब्दाला हक्क आहे 
कृतीमध्ये उतरण्याचा !
भलं असो ,बुरं असो 
वा गोंधळ असो मनातला,
यांच्याचसाठी कुढत असतो
जीव हा माणसाचा !
निराशा कशा या येई वाटेत,
कितीही असो रस्त्यात काटे,
अर्थ त्यातूनच कळतो 
दुर्मिळ या जगण्याचा !
सुख असो वा असो हे दुःख
ते पचवण्या लागतो साऱ्याना 
निर्धार असा तो  मनाचा !
नको तो गर्व , नको तो हेवा 
नको ती भ्रांती अहंपणाची
नसावा कुणातही मीपणा अन
अंश मात्रही स्वार्थाचा !.....

    
        
कवी  -: गणेश शेळके

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!