मी दैवापेक्षा माझ्या निर्णयांवर जास्त विश्वास ठेवतो. वास्तव परिस्थिती चा अभ्यास करून च मी माझं प्रत्येक पाऊल ठेवत असतो.माझ्या स्टेटस ला तुम्हाला जास्त कोण्या महापुरुषांच्या जयंती निमित्त किंवा देवाधर्मानिमित्त फोटो व्हिडीओ दिसणार नाहीत. कारण माझ्यासाठी माझं कर्म आणि मी करत असलेले लोकांच्या भल्या साठीचे सातत्याचे प्रयत्न हेच देवस्वरूप आहेत.देवाने शरीर दिलं त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करणं हेच आपल्या धर्मांनि आणि महापुरुषांनी शिकवलं.पण हल्ली त्यांच्या विचारा ऐवजी नुसता त्यांचे भक्त असल्याचा देखावा मिरवला जातो ...देव आपल्या समोर संधी मांडतो मान्य आहे, पण त्या संधीचं काय करायचं, ती स्वीकारायची की नाकारायची हे निर्णय आपण घेतो म्हणून आपलं यशापयश ठरत असतं..वास्तवात देव ही एक अमूर्त संकल्पना आहे जिला काही स्वार्थी लोकांनी 8 हात देऊन, 10 तोंड देऊन अर्थाचा अनर्थ करून टाकला!... माझ्यामते जे काही चांगलं असेल ते देव आहे आणि जे वाईट असेल ते राक्षस ...देव प्रत्येक ठिकाणी असतो.हवा,अन्न,पाणी,माती,आग,दगड धोंडे,वनस्पती असा मिळून जो खरा देव तयार होतो त्याचं नाव आहे "निसर्ग".... ...