Posts

आत्ताचं प्रेम..

आयुष्यातले कितीतरी क्षण आपण प्रेमासाठी घालतो , पण त्यात पडलेल्या पैकी एखादाच प्रगतीही करतो... कलियुगातलं हे प्रेम क्षणात जुळतं, पण कंटाळा आला म्हणून दुरही पळतं... आताच्या काही प्रेमींची बाप्पा लक्षणंही विचित्र असतात, प्रेमात पडले म्हणजे घरच्यांनाही  विसरत असतात... पहिली गोष्ट म्हणजे या प्रेमाचा काही नेम च नसतो , हृदयाशी खेळला जाणारा तो एक गेमच असतो ... मी म्हणतो प्रेम कसं समजून व्हायला हवं, आपली माणसं आणि प्रगती ही सोबत राहील एवढं मात्र पाहायला हवं... खुपच वेळ वाया जातो या प्रेमात कळतही नसतं, अन कळतही असलं तरी मन वळत  नसतं, प्रेम असतं एक निस्वार्थी बंधन , हृदय नसतं त्यात वाईट हेतूंचं सदन , खरं प्रेम जेव्हा करायला लागतील सर्व, तिथंच निर्माण होऊ शकेल आणखी एक नंदनवन...!               गणेश शेळके           (१३-०६-२०१८)

महत्वाचं आहे, वाचाल तर कळेल...

Image
१० वी चा निकाल लागला की  एक मोठा प्रश्न विद्यार्थ्या समोर उभा राहतो.आता पुढं काय करायचं? कसं करायचं?त्यासाठी खर्च किती येईल?...विद्यार्थ्यानपेक्षा त्यांचे पालक जास्त चिंतेत असतात.मला काही पालक नेहमी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी ,त्यांच्या प्रगतीविषयी प्रश्न विचारत असतात...कसंय की आजच्या काळात स्पर्धा खूप वाढत आहे.त्याहीपेक्षा शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चात खूप वाढ झालीय.आता १० वी नंतर तुम्ही जर मुलांना सायन्स ला टाकसाल, तरी आपल्या कडची शिक्षण पद्धती इतकी भारी आहे की bsc नंतर च्या स्पर्धेत मुलांना नीट टिकू पण देत नाही उलट खूप सारा खर्च करुन झाल्यानंतर आपल्याकडची सायन्स केलेली पोरं सुद्धा एमपीएससी च्या नादास लागतात..। कारण bsc तसेच इतर सायन्स अभ्यासक्रमात तग धरून ठेवण्याची क्षमता फक्त पुष्कळ धनवान आणि योग्य बौद्धिक पातळी असलेल्या पाल्यांमध्येच असते...पैसा बोलतो ,जमाना हलतो अशी गत झाली आहे...गरीब होतकरू मुलांमध्ये क्षमता असूनही ते सायन्स करू शकत नाहीत तेव्हा त्यांनी आर्टस् किंवा कॉमर्स निवडणेच योग्य ठरते.मी सायन्स चे फॉर्म भरले आणि आर्टस् लाच ऍडमिशन घेतली .कारण मी चारही बाजूने विचा...

हिरमुसलेल्या...

Image
हिरमुसलेल्या चेहऱ्यावर खळी जराशी  पडू दे, बहर येईल समृद्धीचा, असं काहीतरी घडू दे... घाई गडबड, होई तडफड, सावरायला मनांना साऱ्या, आधार कोणी मिळू दे..। सुरकुत्या या  चिंतेच्या, थोड्यातरी कमी होऊ दे... मीपणावर मात अन, चांगल्याची किंमत होऊ दे                - गणेश शेळके

घृणांचा पडला प्रभाव असा...

घृणांचा पडला प्रभाव असा , जनावरांचीही  वाटणी झाली, बकरा झाला मुसलमानांचा,  अन गाय बिचारी हिंदूं झाली. मी पाहिले मंदिरांत हिंदू , मस्जिदीत मला मुसलमान दिसले, जाऊन बघितलं रात्री मदिरालायात,  तेच मला माणसं भासले... ही झाडं ,ही पानं,या फांद्यासुध्दा त्रस्त होतील, जर पाखरंसुध्दा काही हिंदू  अन काही मुसलमान होतील , सुके मेवे सुद्धा  बावळून गेले, कसे काय नारळ हिंदू, अन खजूर मुसलमान झाले ? जसे धर्मजातीमध्ये रंगांनाही वाटलं आहे, लाल  रंग म्हणजे हिंदूं , तर हिरवा रंग मुस्लिम आहे... तो दिवस दूर नाही , जेव्हा सगळ्याच्या सगळ्या भाज्या मुसलमानांच्या होतील, अन हिंदूंच्या हिश्यात   गाजर टमाटे काकड्या उरतील! आता प्रश्न असाय की टरबूज कुणाचं म्हणायचं? ते बिचारं वरून राहील मुसलमानांचं अन आतून राहील हिंदूंचं !... (हिंदीतून भाषांतरित करण्याचा छोटासा प्रयत्न...)     गणेश शेळके.

कशी ती...

#ती ....….. कशी ती आली जीवनात माझ्या, रंग भरले तिनं जगण्यात माझ्या, खेळ खेळी केशांशी बेधुंद होऊन , अशी गेली अडकुनी मनात माझ्या... नसेल ती सुंदर इतरांसाठी; पण , हुशारी तिची भावे मनास माझ्या,  गोड तिची वाणी ,खट्याळ तिची भाषा, पाहुनी तिस  झाली बंद माझी ही वाचा.... पण गुणगुणत गाणी तिच्यासाठी रोज , दिवसही जातो  आजकाल गोड माझा , कसली जरी कटी तिनं मजसी न बोलण्याची , तरी मी धडपडत असतो एका झलकेस तिच्या, नको मज तिचं प्रेम ,बस हवंय तेच , जे नसेल कुणासही भेटलेलं अद्याप , जे राहील फक्त जवळ माझ्या...          *(गणेश शेळके)

सांगा बरं...

Image
दिवाळी म्हणजे 'फटाके आणि मोठया आवाजाने वाटणारी गंमत....' असा विचार मुलांमध्ये असतो..खरच सांगा मित्रहो, फटाके फोडून कोणता फायदा होतो बरं...? होणाऱ्या आवाजानं धीट पोरं आनंद घेतात पण तिथच्या आजूबाजूच्या म्हाताऱ्या कोताऱ्या अन चिमुकल्या मंडळींचा विचार करतं कोणी?.... दिवाळी आली रे आली की पोरं एका हप्त्या आधीच फटाके फोडायला सुरू होतात न!...पण या लहान मुलांना फटाक्यापासून होणाऱ्या वाईट परिणामाचं ज्ञान देतं कोणी? ....बरं तुम्हाला फोडायचेच असतील तर कमी आवाजाचे आणि कमी घातक फटाके फोडा की ....ते सुतळी बॉम्ब , तीन आवाजाचे फटाके, ते रॉकेट अन अजून निघतच आहेत नवीन नवीन विस्फोटक आवाजाचे फटाके....!      बरं फक्त दिवाळीचंच असतं तर काही वाटलं नसतं. इथं तर नवीन वर्षांचं स्वागतही  फटाक्यांशिवाय होतंच नाही....आणि जेव्हा लग्नाचा सिजन असतो तेव्हा विचारूच नका बापाहो !...."अमक्याच्या पोरीच्या लग्नात अमुक हजाराचे नुसते फटाके होते ,आता आमच्या पोरीच्या लग्नात टमुक हजाराचे फटाके आणू !"आम्हीच आमच्या पर्यावरणाचा ऱ्हास करायला निघालोय....लहान बाळांच्या कानासाठी ते मोठे आवाज किती घातक असतात मा...

ग्रंथ हेचि गुरू...

Image
एक दिवस सहज बाहेर गेलो होतो.एका ठिकाणी पुस्तकांचं भव्य प्रदर्शन भरलेलं दिसलं.मी आत गेलो अन खूप सारे पुस्तकं चाळून बघितली.तिथल्या पुस्तकांपैकी एक जरी वाचलं तर आयुष्याचे महत्वाचे धडे शिकायला भेटू शकतात. 'द पॉवर ऑफ हॅप्पी थॉट्स' नावाचं पुस्तक मी तीन वर्षांपूर्वी थोडंच वाचू शकलो होतो पण त्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला की माझे परिस्थितीकडे बघण्याचे विचार अन दृष्टिकोनच बदलून गेलेत..ग्रंथ हेच आपल्याला आपल्या अडचणींवर उपाय शोधण्यात मदत करू शकतात.निर्जीव पेजेस ची ही पुस्तकं ,पूर्ण इतिहास अन जगाला आपल्या समोर सजीव बनून व्यक्त करत असतात.. आज तुम्हाला कोणी मार्गदर्शक जर भेटत नसेल तर रिकामे फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा चांगले चांगले ग्रंथ वाचण्यात वेळ घालावा.ज्ञानात भर पडली की अडचणी आपोआप कमी होतात.असे खूप विषय आहेत ज्याबद्दल कुणाला काहीच माहीत नसतं पण हे पुस्तकं तेपण आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध करून देतात. लिहिणाऱ्या प्रत्येक माणसानं आतापर्यंत अनेक जग बदलून टाकणारी कितीतरी ग्रंथ, पुस्तकं,कादंबऱ्या असे खूप सारे साहित्य लिहून ठेवले आहेत.खरच किती प्रगल्भ विचारवंत आहेत आपल्या देशात ज्यां...
Image
बालपणापासून सोबत असलेले माझे मित्र मला कधी कधी भेटतात तेंव्हा खूप आनंद होतो ,पण....ज्यावेळी असाच बोलता बोलता माझा तो प्रिय मित्र खिशातुन गुटख्या ची पुडि काढतो किवा तंबाकू काढतो तेंव्हा आपली मैत्री हरल्यासारखंच दुःख होतं......जे मित्र कधीच व्यसन करत नव्हते ते आज भेटतात तर खिशात पुड्या घेऊन...!...माझी हीच मित्रमंडळी महाराजांच्या किंवा ,बाबासाहेबांच्या नावाचा रुबाब मीरवतात त्यावेळी मात्र तळपायाची आग मस्तकात जाते....! जो मित्र कधी काळी आपला सर्वात जवळचा वाटायचा तो या गोष्टीमुळे नको नकोसा वाटू लागतो....काही विचारले तर साले नुसतं परिस्थितीचे कारण पुढं करतात आणि "तुला नाय कळणार.." असं म्हणून गप्प करतात... सालं यापेक्षा आणखी वाईट गोष्ट कुठली असणार एका खऱ्या मित्रासाठी?...काय चुकी आहे त्यांच्या आय बापांचि ?....काय खरंच टेन्शन आल्यावर फक्त व्यसन हाच योग्य मार्ग भेटतो यांना ?...   Gkshelke..